पालकांनो, पाल्यांना सुसंस्कारित
करण्यासाठी स्वतः धर्मशिक्षण घ्या आणि मुलांनाही द्या !
१.
लहान मुले देवतांची वेशभूषा करून आणि देवतांविषयी
विनोद सांगून त्यांचा अनादर अन् विडंबन करतांना दिसणे
आणि त्याला त्यांचे पालक अन् अन्य हिंदूंनी प्रोत्साहन देणे
विनोद सांगून त्यांचा अनादर अन् विडंबन करतांना दिसणे
आणि त्याला त्यांचे पालक अन् अन्य हिंदूंनी प्रोत्साहन देणे
एकदा आम्ही एका वसाहतीत गणेशाचे दर्शन
घेण्याच्या निमित्ताने गेलोहोतो. त्या वेळी तेथे लहान मुलांची वेशभूषा स्पर्धा
आयोजित केलेली होती.लहान मुले देवतांची वेशभूषा करून आली होती. त्यांच्या
पालकांनीच त्यांनासिद्ध करून आणलेले होते. या स्पर्धेत देवतांची वेशभूषा केलेली ही
लहान मुलेध्वनीक्षेपकासमोर येऊन विनोद सांगत होती. नकला करत होती. दुर्दैवाची
गोष्टम्हणजे ज्या गणेशाची आणि अन्य देवतांची कृपा संपादन करण्यासाठी हा उत्सवसाजरा
केला जात होता, त्या देवतांविषयीच अनादराने विडंबनात्मक बोलले जातहोते.
मुलांनी सांगितलेल्या विडंबनात्मक विनोदांपैकी दोन उदाहरणे पुढे देतआहे.
अ. एका मुलाने म्हटले, "जय
काली मां !" तेव्हा काली मां प्रकट होऊनम्हणाली, "तुझी
आई काळी असेल ! मी तर 'फेअर अॅण्ड लव्हली'
(गोरेपणावाढवण्याची क्रीम) लावते.
आ. एकदा पार्वतीला शिवाच्या हातात
त्रिशूळ दिसला नाही; म्हणून तिनेशिवाला विचारले,
"तुमचा त्रिशूळ कुठे आहे ?" शिवाने
सांगितले, "गणेश घेऊनगेला आहे." तेवढ्यात गणपति येतो. त्याला पार्वती
विचारते, "तू त्रिशूळ घेऊनका गेला होतास ?"
तेव्हा गणेश सांगतो, "आज
प्रसादात चाऊमीन (एक चायनीजपदार्थ) ठेवला होता. तो खाण्यासाठी मी त्रिशूळ घेऊन
गेलो होतो."
अशा प्रकारे मुले देवतांचा अनादर करणारे
विनोद सांगत होती आणि त्यांचेपालक अन् उपस्थित अन्य हिंदू टाळ्या वाजवून मुलांना
प्रोत्साहन देत होते.सर्वांत शेवटी या सर्व मुलांना चित्रपटाच्या गाण्यावर
नाचण्यास सांगण्यातआले.
२.
धर्मशिक्षणाच्या अभावामुळे पाल्यांना
सुसंस्कारित करण्यास असमर्थ असणारे हिंदू पालक !
सुसंस्कारित करण्यास असमर्थ असणारे हिंदू पालक !
हे सर्व पाहून मनात आले, 'धर्माचा अभिमान
जोपासण्याच्या हेतूने येथीलहिंदूंनी इकडे गणेशोत्सवाची प्रथा नसतांनाही हा उत्सव
चालू केला खरा; परंतुधर्मशिक्षणाच्या अभावामुळे 'योग्य काय आणि अयोग्य
काय ?' हेच हिंदूंनाठाऊक नाही आणि ते सांगणारेही कुणी उरलेले नाही.
उद्देश चांगला असला, तरीदिशा चुकीची असल्यास आपण योग्य कृती करू शकत नाही.
त्याप्रमाणेधर्मशिक्षणाच्या अभावी आपण स्वतःही धर्मपालन आणि धर्माचरण करू शकत नाही
अन्पुढच्या पिढीलाही त्या दिशेने घेऊन जाऊ शकत नाही. यावरूनच स्वतःधर्मशिक्षित
होण्याचे आणि समाजातही धर्मशिक्षण देऊन धर्मजागृती करण्याचेमहत्त्व लक्षात आले.
पालकांनो, आपल्या पाल्यांना सुसंस्कारितकरण्यासाठी केवळ उत्सवात सहभागी करणे
नव्हे, तर धर्माचे शास्त्रशुद्ध ज्ञानदेणे आवश्यक आहे.
हे लक्षात घ्या !'
– सौ. स्वानंदी अविनाश जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१. सुसंस्कारित मन जिवाला भरकटू देत नाही !
‘सुसंस्कारित मन जिवाला कोठेच भरकटू देत नाही. यासाठीच मुलांचेमनसुसंस्कारित करणे हे मोठ्यांचे, हिंदु धर्माचरण करणार्या लोकांचे, समाजाचे कर्तव्य आहे. देवाने दिलेली ही समष्टी सेवा आहे; पण हे समाजाला कळतनाही आणि तो भरकटलेल्या तरुण युवकांप्रमाणे दूरदर्शनाच्या, त्यातीलअनावश्यक मालिका यांच्यात वहावत गेला आहे.२. कुसंस्कार होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे सर्वत्र फोफावलेला चंगळवाद
‘आम्हाला कोठे हे लहानपणी मिळाले ? आम्ही पूर्ण बालपण मोठ्यांच्याकह्यात राहून मन मारले. आता मिळतेय ते आधाशासारखे खाऊया. मनाप्रमाणेचकरूया’, हे विचार लोकांच्या मनात प्रबळ असतात. असे कुसंस्कारित मन पुढच्यापिढीवर कायसंस्कारकरणार ? त्यामुळेच पुढची, म्हणजेच आताची पिढी पूर्ण भरकटली गेली आहे.त्यातच प्रसारमाध्यमे, रस्त्यावरही सहजपणे दिसणारी अयोग्य विज्ञापने, भ्रमणभाष, ई-मेल, फेसबूक अशी अनंत आधुनिक साधने सहजपणे उपलब्ध झाल्यानेत्यात भरच पडली आहे. त्यातून योग्य ते शिकण्यापेक्षा नको त्या मार्गालानवीन पिढी वहावत चालली आहे. प्रत्येक सुसंस्कार आपणास देवाकडे नेतो; पणकुसंस्कार असुरांच्या राज्यातच नेऊन सोडतो आणि अराजकही माजवतो. तेच आजआपणाला सर्वत्र दिसत आहे.३. समाजाला आज सुराज्याची आवश्यकता आहे !
समाजाला आज पाहिजे आहे एक सुराज्य. त्यात असेल धर्माचरण. राष्ट्र, धर्म, देव यांना मानणारा आदरणीय समाज. तोच या युवा पिढीला सन्मार्ग दाखवील.यासाठीच सनातन संस्था आणि काही हिंदुत्ववादी संघटना सतत कार्यरत आहेत.त्याच समवेत पाहिजे देवाचे अधिष्ठान.समर्थ रामदासांनीम्हटले आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे । जो जो करील तयाचे । परंतु तेथेभगवंताचे । अधिष्ठान पाहिजे ॥ तेच सात्त्विक काम सनातन संस्थेचे संस्थापकपरात्परगुरु प.पू. डॉ. जयंत बाळाजी आठवले करत आहेत. त्याला अनेक संत आणिसाधक हातभार लावत आहेत.४. पुढची पिढी सुसंस्कारित करण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी सत्सेवा !
नागरिकांनो, आदर्श राज्य येणारच आहे; पण त्यासाठी पुढची पिढीसुसंस्कारित व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.जसे श्रीकृष्णाने करंगळीनेगोवर्धन पर्वतउचललाच होता; पण त्यात स्थुलातून प्रत्येक गोप-गोपी काठी लावून सहभागीझाले होते, तशीच स्थिती आजही आहे. आपल्यालाही तेच कार्य करून केवळ हातभारलावण्यास सज्ज व्हायचे आहे. ‘चला सिद्ध होऊ या पुढची पिढी सुसंस्कारितकरायला ! तीच आपली सत्सेवा आहे. हे लक्षात घेऊया.’– श्रीमती रजनी नगरकर, रामनाथी, गोवा.
मुलांना वेळीच संस्कारक्षम करणे आवश्यक !
आषाढ कृष्ण पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५११५
(२८.७.२०१३) या दिवशी मीमुंबईत आगगाडीने प्रवास करत होते. त्या वेळी माझ्या समोर २
कुटुंबे बसलीहोती. दोन्ही कुटुंबात प्रत्येकी एक मुलगा होता. दोन्ही मुलगे
आपल्याआई-वडिलांसमवेत खेळत होते. खेळता खेळता त्यातील एका मुलाने
ठोसालगावल्याप्रमाणे हाताची मूठ त्याच्या वडिलांसमोर धरली. काही मिनिटांनीदुसर्या
मुलाने वडिलांच्या तोंडाच्या दिशेने बंदूक धरल्याची कृती करूनगोळी मारल्याप्रमाणे
केले. आई-वडिलांपैकी कुणीही त्या मुलांना ओरडले नाही, उलट ते मुलांना हसून
प्रतिसाद देत होते.
ही दृश्ये पाहिल्यावर जाणवले की, हा सर्व सध्याच्या
चित्रपटांचाचपरिणाम आहे. अनेक चित्रपटांतून हिंसक वृत्तीचे प्रदर्शन मांडण्यात
येते.मारामारी, एकमेकांच्या हत्या करणे,
दंगली आणि जाळपोळ अशी दृश्ये
सर्रासदाखवली जातात. त्याचाच परिणाम मुलांच्या कोवळ्या मनावर होतो. त्यामुळे
तीहीहिंसकतेकडे वाटचाल करू लागतात. पूर्वीच्या काळी मुले आई-वडिलांसमोर
केवळनमस्काराचीच मुद्रा करायची; पण आता वडिलांच्या दिशेने बंदूक धरल्याची कृतीकरणे, म्हणजे समाजाची
नैतिकता किती रसातळाला जात आहे, हे यातून लक्षातयेते. हीच मुले मोठी झाल्यावर खून, मारामारी करणार नाहीत, हे कशावरून ? उद्या याच मुलांनी
आई-वडिलांच्या दिशेने खरोखरची बंदूक धरल्यास आश्चर्यवाटायला नको. मुलाने
आई-वडिलांची हत्या केली, अशी अनेक उदाहरणे आपणवर्तमानपत्रांतून वाचलीही आहेत. अयोग्य
कृतींना आई-वडिलांकडून दिल्याजाणार्या सकारात्मक प्रतिसादामुळेच आजची पिढी बिघडत
चालली आहे.
संस्कार म्हणजे काय, हेच आजच्यामुलांना ठाऊक नाही. आई-वडिलांनीच मुलांना संस्कारक्षम
करायला हवे. भावीपिढी सुसंस्कारक्षम घडवण्यासाठी आता हिंदु राष्ट्राविना पर्याय
नाही !
– सौ. नम्रता दिवेकर, पनवेल.
आई-वडिलांशी
कसे वागावे ?
आई-वडील आणि घरातील मोठ्या व्यक्ती यांना वाकून नमस्कार करावा
आई-वडील,
तसेच घरातील आपल्यापेक्षा
वयाने मोठ्या असलेल्या सर्व व्यक्तींना वाकून, म्हणजे त्यांच्या पायाला हात लावूननमस्कारकरावा.
‘मातृदेवो
भव । पितृदेवो भव ।’ म्हणजे
‘माता-पिता हे
देवासमान आहेत’, अशी
आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे.
आई-वडिलांचे महत्त्व
जाणणार्या आणि
त्यांची सेवा करणार्या काही
थोर विभूती
श्रावणबाळ
:याने आपल्या अंधआई-वडिलांची सेवा न थकता सतत केली. वृद्ध आई-वडिलांनी
काशीयात्रेलाजाण्याची इच्छा व्यक्त केल्यावर याने लगेच ती पूर्ण करण्याच्या
दृष्टीनेपावले उचलली.श्रावणबाळानेत्यांना कावडीत (काठीला
तराजूसारख्या दोन टोपल्या लावून त्यात) बसवले आणिती कावड खांद्यावर घेऊन तो
काशीयात्रेला पायी जायला निघाला.
प्रभु
श्रीरामचंद्र : ‘अयोध्येचे
राज्य धाकटा बंधू भरत याला देऊन रामाने १४ वर्षे वनवासाला जावे’, या माता कैकेयीच्या आज्ञेचेरामानेमनःपूर्वक पालन केले आणि वडिलांचेही
वचन राखले.
भक्त
पुंडलीक :याने आई-वडिलांची केलेली सेवा म्हणजे तपश्चर्याच होती. या तपश्चर्येमुळेश्री विठ्ठलहीप्रसन्न होऊन त्याला भेटण्यासाठी
आला. त्या वेळी आई-वडिलांच्या सेवेतथोडाही खंड पडावयास नको; म्हणून पुंडलिकाने जवळची एक वीट भिरकावून
श्रीविठ्ठलाला तिच्यावर उभे रहाण्याची विनंती केली.
छत्रपती
शिवाजी महाराज :जिजामातेचीभेट होताच शिवराय प्रथम तिला
नमस्कार करायचे. महाराज जिजामातेचे सर्वऐकायचे आणि तशी कृतीही करायचे. युद्धावर
जातांनाही ते तिला नमस्कार करूनतिचा आशीर्वाद घेऊनच जायचे.
आई-वडिलांची सेवा मनापासून करण्याचे फळ
‘आई-वडील
आणि गुरु यांची सेवा करणे, ही
सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे’, असे
धर्मशास्त्रात म्हटले आहे.
तुष्टायां मातरि शिवे तुष्टे
पितरि पार्वति ।
|
अर्थ
:भगवान शंकर म्हणतात, ‘‘हे
पार्वती, आई-वडिलांना
संतुष्ट करणार्या जिवावर तुझी कृपा होते. अशा जिवावर परब्रह्मही प्रसन्न होते.’’
आई-वडिलांना कधीच दुखवू नये
आई-वडील
मुलांसाठी पुष्कळ कष्ट सोसतात.मुलांचे बालपण चांगले जावे, त्यांना चांगले शिक्षण मिळावे यांसाठी तेप्रयत्न
करतात; परंतु काही
मुले आई-वडिलांना उलट बोलतात. त्यामुळेआई-वडिलांचे मन दुखावले जाते. मुलांच्या उलट
बोलण्यामुळे आई-वडील दुखावलेगेले, तर
ते देवालाच दुखावल्यासारखे होते. मुलांनो, हे टाळण्यासाठीआई-वडिलांशी प्रेमाने वागावे आणि त्यांच्याविषयी
कृतज्ञ रहावे.
आई-वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐकावे
आई
मुलांच्या आवडी-निवडीनुसारखाद्यपदार्थ बनवते, तसेच मुलांना काय हवे-नको ते लक्षपूर्वक
बघते. आजारपणातत्यांची रात्रंदिवस प्रसंगी जागरण करूनही काळजी घेते. हे सर्व करत
असतांनाती स्वतःकडे मुळीच लक्ष देत नाही. तिच्या डोक्यात सतत मुलांचाच विचारअसतो.
वडीलही मुलांच्या सर्व आवश्यकता पुरवण्यासाठी आणि कुटुंबाचे पालनपोषणकरण्यासाठी
कष्ट करून पैसे मिळवतात. जे लागेल ते मुलांना आणून देतात. असेअसतांना मुलांनी ‘आपण आई-वडिलांचे मनापासून ऐकतो का’,
याचा विचार करायलाहवा.
मुलांनो,
खरेतर आई-वडिलांची कितीहीसेवा
केली, तरी त्यांचे ऋण
फिटू शकणार नाही. आई-वडिलांच्या ऋणातून थोडेतरीमुक्त होण्यासाठी त्यांनी
सांगितलेले मनापासून ऐकावे, तसेच
त्यांच्याशीनेहमीच आदराने बोलावे.
आई-वडिलांवरील प्रेम कृतीतूनही व्यक्त करावे
मुलांचे
आई-वडिलांवर प्रेम असतेच; पणते
प्रेम कृतीतूनही व्यक्त व्हायला हवे. मुलांचे प्रेम कृतीतून व्यक्तझाल्यावर
आई-वडिलांनाही आनंद होतो. उदाहरण म्हणून अशा काही कृती पुढे देतआहोत.
आई-वडील
बाहेरून आल्यावर त्यांना चटकन पाणी आणून द्यावे :मुलांनो, आई-वडील बाहेरून घरी आले की, तुमच्यापैकी किती जण त्यांनी नमागता
पाणी आणून देतात ? पाणी
मागितल्यावरसुद्धा किती जण आईला ‘काय
ग ? घेना तुझे तू’,
असे उलट बोलतात ? मुलांनो, असे बोलणे अयोग्य आहे. आई-वडीलबाहेरून दमून
आलेले असतात. अशा वेळी तुम्ही लगेच त्यांना पाणी आणून दिले, म्हणजे त्यांनाही चांगले वाटते.
आई-वडिलांना
त्यांच्या कामांत साहाय्य करावे :आईला गिरणीवरून दळण, पेठेतून (बाजारातून) भाजी इत्यादी आणून
द्यावे. त्यासाठी तिच्याकडे चॉकलेट आदी खाऊ मागू नये.
आई-वडिलांना
त्रास न देता स्वतःची कामे स्वतः करावीत !
आई
निजलेली असतांना तिला न उठवता स्वतःचे जेवण स्वतः वाढून घेणारी कु. मृणाल :
‘कु. मृणाल आठ वर्षांची
असतांना तिच्या शाळेतून येण्याच्या वेळेला मलाबर्याचदा झोप लागलेली असायची.
तेव्हा ती मला न उठवता स्वतःच जेवण वाढूनघ्यायची.’ – सौ. शुभदा दाणी (कु. मृणालची आई), सातारा मार्ग, पुणे. (वर्ष२०११)
घरातील
अन्य कामे करावीत :
१.
जेवणापूर्वी सर्वांची ताटे-वाट्या, पाट-पाणी
इत्यादी घ्यावे. जेवण झाल्यावर सर्व आवरून ठेवावे.
२.रात्री
सर्वांची अंथरुणे घालून ठेवावीत.
३.आई-वडिलांचे
पाय चेपावेत.
आई-वडिलांना नमस्कार करण्यात लाज वाटू देऊ नका !
'मातृदेवोभव
। पितृदेवो भव । (म्हणजे माता – पिता
देवासमान आहेत.)', अशी
आपल्या महान हिंदु संस्कृतीची शिकवण आहे. `आई-वडीलवगुरुयांची सेवा करणे, ही सर्वांत उत्तम तपश्चर्या आहे',
असे `मनूस्मृती' या ग्रंथात म्हटले आहे. पुंडलिकाच्या या
तपश्चर्येमुळेविठोबात्याच्यावर प्रसन्न झाला होता. मुलांनो,
पुंडलिकाचा आदर्श समोर
ठेवूनआपणही आई-वडिलांचे मनापासून आज्ञापालन करणे व त्यांची लीन
भावानेसेवा-शुश्रुषा करणे, हे
आपले कर्तव्यच आहे.
तुष्टायां मातरि शिवे तुष्टे
पितरि पार्वति ।
-महानिर्वाणतंत्र |
भावार्थ
: आई-वडील संतुष्ट झाल्यास
परमेश्वरही प्रसन्न होतो. यासाठी मुलांनो, आई-वडिलांनी सांगितलेले मनापासून ऐका.
त्यांच्या कामात त्यांना मदत करा.त्यांना देवासमान मानून त्यांची सेवा करा.
प्रत्येक
मुलाने आई-वडिलांचे कृतज्ञअसले पाहिजे. आपण कोणत्याही सामान्य व्यक्तीपुढे विनम्र
झाले पाहिजे. आपणइतरांशी मानसन्मानानेच वागले पाहिजे. प्रत्येक आई-वडिलांनी अनेक
कष्टसोसलेले असतात व त्याग केलेला असतो. जरीशिक्षकांनीअथवा आई-वडिलांनी मुलाला शिक्षा
केली तरीही मुलांनी त्याच्याबद्दलकृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ते आपल्यावर का
रागावले, याचे मुलांनी
चिंतनकेले पाहिजे. `निश्चितच
आपली काही चूक असली पाहिजे', असा
सूज्ञ विचारत्याने केला पाहिजे. कारण रागावण्यामुळे आई-वडील किंवा शिक्षक
यांचावैयक्तिक काहीच फायदा होत नाही. आपल्या मुलाने सुधारावे, त्याची वागणूकआदर्श व्हावी व
लोकांनी त्याला चांगले म्हणावे या गोष्टींच्या ध्यासापोटीहा राग व रागवणे असते.
तिर्हाईताच्या मुलांना आई-वडील रागावत नाहीत.आपल्या मुलाच्या प्रेमापोटी हा राग
असतो व यामुळे मुलांनी याबद्दल मनात रागन धरता आई-वडील व शिक्षक यांचे आभारच मानले
पाहिजेत. या जगात फुकट अशीकोणतीच गोष्ट मिळत नाही. आपले आई-वडील आपल्याला खाऊ,
खेळणी अन्न, वस्त्रइत्यादी सर्व गोष्टी मायेने
पुरवतात. त्याच्या बदल्यात मुले त्यांना कायदेतात ? ते पैसे तर देऊ शकत नाहीत. निदान मुलांनी
आई-वडिलांना आदर तरीद्यावा. घरातील वडील मंडळींच्या दररोज पाया पडून त्यांचे
आशीर्वाद घ्यावेत.एखाद्याने आपल्याला काही दिले, तर आपण त्यांचे आभार मानतो. आदरपूर्वक
आभारमानण्याची अथवा कृतज्ञता व्यक्त करण्याची पारंपरिक भारतीय पद्धती म्हणजेवाकून
नमस्कार करणे होय. काही मुलांना आपल्या आई-वडिलांच्या पाया पडायचीलाज वाटते. आपली
आई आपले मल-मूत्र साफ करणे, कपडे
धुणे, आपल्याला
आवडणारेजेवण करणे, जेवू
घालणे यासाठी दिवसातून कितीतरी वेळा आपल्यासाठी खालीवाकते. मुलाच्या चुकीमुळे काही
वेळा आई-वडिलांना शरमेने मान खाली घालावीलागते. या सर्व गोष्टींची परतफेड करता
येणे शक्यच नाही. मग निदानआई-वडिलांना खाली वाकून नमस्कार करण्यात मुलांना मुळीच
लाज वाटू नये.
मुलांवर लहान वयातच संस्कार कसे करावेत ?
संस्काराचा
मूळ पाया म्हणजेशिस्त. प्रत्येक कृतीला जर शिस्त,
नियम घालून घेतले नाहीत, तर ती कृती
अपूर्णहोते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत शिस्तीचे काटेकोर पालन केले, तर अध्यात्मातील
प्रगती जलद होते. त्यासाठी लहानपणीच शिस्तीचेसंस्कारबालमनावर रुजवायला हवेत.
मुलांना
स्ववलंबी बनवणे
लहानपणीच
मुलांना योग्य वळण लावावे.झोपून उठल्यावर स्वतःच्या पांघरुणाची घडी घालायला
शिकवावे. सुरुवातीला नीटयेणार नाही;
पण हळूहळू मूल जसे मोठे होईल, तसा व्यवस्थितपणा त्याच्या
अंगीआल्याशिवाय रहाणार नाही. सकाळचे आन्हीक उरकल्यावर शाळेचाअभ्यास, शाळेची तयारी त्यांची
त्यांनाच करायला शिकवावी. अभ्यासाची पुस्तके,
वह्यानिटनेटक्या व जागच्याजागी ठेवायचे
वळण लावावे. शाळेतून अथवा बाहेरूनआल्यावर चप्पल-बूट,
दप्तर वगैरे ठराविक जागीच ठेवायला
शिकवावे. तसेच हातपायस्वच्छ धुतल्यावर कपडे बदलून त्यांच्या नीट घड्या घालून
ठेवण्यास शिकवावे.कपड्याचे बटण अथवा हुक तुटले असल्यास किंवा कपडे थोडेसे उसवले
असल्यासत्यांचे त्यांनाच शिवायला शिकवावे. स्वतःचे स्वतः करण्यात मुलांनाही
आनंदवाटतो. वयानुसार स्वतःचे कपडे धुवायलापण शिकवावे.
सकाळ-दुपारचा
नाश्ता झाल्यावर कपबशी वताटली घासायला शिकवावी. थोडक्यात म्हणजे मुलांना स्वावलंबी
करावे. त्यातमुलगा-मुलगी असा फरक नको. प्रत्येक गोष्टीचे नीट वळण लावले, तर मूल घरी असोवा इतर
ठिकाणी, ते नेटकेपणानेच वागेल.
वेळोवेळी
प्रार्थना व कृतज्ञता व्यक्त करायला शिकवणे
सकाळी
झोपून उठल्याबरोबर मुलांना अंथरुणातचप्रार्थनाकरायला
व आजचा दिवस ईश्वराने दाखवल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाशिकवावे. तोंड
धुतल्यावर देवाला नमस्कार करायला सांगावे. कोणतीही गोष्टखाण्यापूर्वी
त्यांच्याकडून प्रार्थना म्हणवून घ्यावी. तसेच प्रत्येक गोष्टईश्वरकृपेनेच झाली, हे त्यांच्या मनावर
बिंबवावे.
लवकर
निजणे व लवकर उठणे
लहानपणापासूनच
मुलांना लवकर उठण्याचीसवय लावावी. पुष्कळ घरांतून बघायला मिळते की, मुले अभ्यासासाठी
रात्रीजागतात व सकाळी ८-९ वाजता उठतात. याउलट रात्री लवकर झोपून पहाटेअभ्यासकेला
असता तो जास्त चांगला लक्षात रहातो. ‘लवकर निजे व लवकर उठे,
त्यास आरोग्य व धन-संपत्ती मिळे ।’, असाश्लोकआहे. पूर्वीच्या काळीऋषीमुनीब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत असत. रात्री रज-तमाचे
प्राबल्य असते.याउलट पहाटे सात्त्विकता असल्यामुळे त्याचा अभ्यासावर चांगला परिणाम
होतो.
प्रत्येक
गोष्ट वेळेवर करण्यास शिकवणे
मोठ्यांच्या
कृतींतूनच लहान मुलेशिकतात; म्हणून मोठ्यांनीच आपले वागणे,
बोलणे,
इतरांना मान देणे, हे सर्वकेले पाहिजे.
तसेच प्रत्येक गोष्ट वेळेवर करावी. ‘मग करू’ म्हटले की, पुन्हा ती गोष्ट केली जात नाही. त्यासाठी शरीराला
म्हणण्यापेक्षा मनालाचशिस्त लावायला पाहिजे. पुष्कळांच्या घरी कपाटात, रॅकमध्ये कपडे
कोंबलेलेकिंवा अस्ताव्यस्त लटकलेले असतात. तसेच घरही अव्यवस्थित असते. मग घरात
कोणीअचानक आले, तर धांदल उडते. एकदा हाताला वळण लावले की, मनाला ते
नीटकेल्याशिवाय स्वस्थता लाभत नाही. घर स्वच्छ व नीटनेटके ठेवण्यामध्ये आळसनको.
आळस हा आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे,
हे मुलांच्या मनावरबिंबवावे.
मुलांचे
अती लाड करणे टाळणे
आजकाल
घरांतून एखाद-दुसरेच मूलअसल्याने त्यांची आवड-नावड जपली जाते. जेवण, कपडे सर्वच बाबतींत ‘मुलेम्हणतील ती पूर्व
दिशा’, असे आढळून येते. लहानपणापासून त्यांचे ऐकत गेलेकी, मुले पुढे ऐकेनाशी
होतात. त्यामुळे त्यांचे अती लाड करू नयेत.
मुलांपुढे
स्वत:चा आदर्श ठेवा !
घराचे
‘सत्यं शिवं सुंदरम्’
करायचेअसेल, तर शिस्त, आज्ञापालन, मोठ्यांचा आदर करणे, हे सर्व करता आले
पाहिजे.मोठ्यांनी आपला आदर्शच असा निर्माण केला पाहिजे की, आपले वळण, शिस्त बघूनआपले मूलही
आपले अनुकरण करील. असे झाले, तर आदर्श कुटुंब व्हायला वेळलागणार नाही.
सोळा
संस्कार करण्याची उद्दिष्टे
सोळा संस्कार करण्याची उद्दिष्टे
भारतीय
परंपरेप्रमाणे मनुष्याचीप्रत्येक कृती संस्कारयुक्त असावी. सनातन धर्माने प्रत्येक
जिवालासुसंस्कृत बनवण्यासाठी गर्भधारणेपासून विवाहापर्यंत सोळा प्रमुखसंस्कारसांगितले आहेत. या संस्कारांची
उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत.
१.
बीजदोष न्यून करण्यासाठी संस्कार केले जातात.
२.
गर्भदोष न्यून करण्यासाठी संस्कार केले जातात.
३.
पूर्वजन्मांतील दुष्कृत्यांमुळे देव आणिपितर यांचे काही शाप असल्यास, त्यांची बाधा अल्प करण्यासाठी,
देव अन् पितरयांच्या ऋणातून
मुक्त होण्यासाठी आणि कुलदेवता, इष्टदेवता,
मातृदेवता, प्रजापति, विष्णु, इंद्र, वरुण, अष्टदिव्पाल, सवितादेवता, अग्निदेवताइत्यादी देवतांना प्रसन्न करून
त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी संस्कार केलेजातात.
४.
मुलगा आरोग्यवान, बलवान
आणि आयुष्यमान होण्यासाठी संस्कार करतात.
५.
मूल बुद्धीवान, सदाचारी,
धर्माप्रमाणे आचरण करणारा
होण्यासाठी संस्कार करतात.
६.
आपल्या सत्कृत्याने आणि धर्मपरायणवृत्तीने आत्मोन्नती करून आपल्या वंशाच्या
पूर्वीच्या बारा अन् पुढील बारापिढ्यांचा उद्धार करण्याची क्षमता मुलात येण्यासाठी
संस्कार करावेत.
७.
स्वतःची आध्यात्मिक उन्नती करून ब्रह्मलोकाची प्राप्ती किंवा मोक्ष मिळवण्याची
क्षमता येण्यासाठी संस्कार करावेत.
८.
सनातन धर्माप्रमाणे प्रत्येकाचीप्रत्येक कृती आणि त्याचप्रमाणे प्रत्येक
संस्कारसुद्धा परमेश्वरालाप्रसन्न करण्यासाठी असतो; कारण परमेश्वराची कृपा असल्यासच आपली
उद्दिष्टेपुरी होऊ शकतात.
द्रव्यावरील आयुर्वेदातील संस्कार
कोणत्याही
द्रव्यावर त्याचे गुणपालटण्यासाठी, म्हणजेच
वाईट गुण आणि त्यांचे शरिरावरील कार्य अल्प किंवानाहीसे करून चांगले गुण अन् कार्य
वाढवण्यासाठी करावयाची जी क्रिया, तिलाच
‘संस्कार’ असे म्हणतात.
‘संस्कारो हि गुणान्तराधानं उच्यते ।’– चरक सूत्रस्थान २६-३४ |
संस्कार
म्हणजे पवित्रता, शुद्धता,
स्वच्छता. अन्न शिजवल्यामुळे
(अग्नीसंस्कारामुळे) पचवता येते. औषधखलल्यामुळे सूक्ष्म होते आणि अधिक गुणवान
होते. मर्दनं गुणवर्धनम् ।
जमालगोटा
(जयपाळ) हे एक रेचक औषध आहे.त्याला इंग्रजी भाषेत ‘क्रॉटन पॉलिअॅन्ड्रम’, असे म्हणतात. रेच होतअसतांना पोटांत
मुरडा होतो. जयपाळ लिंबाच्या रसातून खाल्ल्यास मुरडा होतनाही. याला संस्कार असे
म्हणतात.
जड वस्तूंवरील संस्कार
दगडातून
मूर्ती बनवण्यासाठीशिल्पकाराला दगडावर हातोडा मारून दगडाचा नको असलेला भाग काढून
टाकावा लागतोआणि नंतर छिन्नीने कोरीव काम करावे लागते. असे आघात सहन करूनच,
म्हणजेसंस्कार होऊनच दगडाला
देवत्व प्राप्त होते. याचप्रमाणे प्रत्येक माणसाचेपूर्वी मनुष्ययोनीत अनेक वेळा
जन्म झाले असतांनाही त्याला परत शिकवावेलागते आणि त्याच्यावर संस्कार करावे
लागतात.
एखादा
माणूस जन्मापासून अरण्यातराहिला आणि माणसांच्या संपर्कात आलाच नाही, तर तो कधीच बोलू शकणार नाही.घरातील
माणसांचे बोलणे ऐकून आणि त्यातील भाव समजून मूल हळूहळू बोलायलाशिकते. पूर्वीच्या
जन्मात तीच भाषा असेल, असेही
नाही. भाषा नवीन असल्यासमनालाही भाषेचा अभ्यास करायला वेळ लागणे स्वाभाविक आहे.
तीच भाषा असली, तरीभाषेतही
पालट होत असतात. ६०० वर्षांपूर्वीची मराठी भाषा आज पुष्कळपालटलेली आहे.
मनाची
अभिव्यक्ती मानवी मेंदू आणिशरिरातून होत असल्याने देहाच्या कृती अन् कौशल्यासह
मनाचे विचार आणि कुशलताअधिकाधिक व्यक्त होतात.
विज्ञानाच्या
प्रगतीमुळे बाहेरच्याउपकरणांत, तंत्रात
आणि सुविधांमध्ये विशेषतः गेल्या शतकात पुष्कळ पालट झालाआहे. ६०० वर्षांपूर्वी
जन्म झालेल्या माणसाचा आता परत जन्म झाल्यासदूरचित्रवाणी,
विमान, संगणक इत्यादी पाहून आपण स्वर्गात जन्म
घेतला आहे कि काय, असेवाटेल
आणि याविषयाची माहिती, त्यांचे
तंत्र अन् त्याविषयीचे शिक्षण घ्यावेलागेल. अध्यात्मशास्त्र परिपूर्ण असले आणि
त्यात काही पालट झालेला नसला, तरी
अध्यात्मशास्त्र समजण्यासाठी त्याला विज्ञानाच्या शोधाचा पुष्कळ उपयोगहोईल. तसेच
अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठी पूर्वीची उदाहरणे न देता आधुनिकउदाहरणे द्यावी
लागतील. नवीन देहासह मनालाही चालायला, बोलायला शिकावेलागते. समजा ज्या घरात जन्म झाला आहे, त्या घरातील माणसांना
बोलतांनाशिव्या द्यायची सवय असेल, तर
तो मुलगा शिव्या द्यायला शिकेल. जेथेनामस्मरण,
भजन, कीर्तन चालू असते, अशा घरात जन्म झाल्यास त्याला नामजप
करण्याची सवय लागेल आणि त्याच्यावर चांगले संस्कार होतील.
त्यासह
पूर्वजन्मीचे शिक्षण आणिसंस्कार यांचाही या जन्मी लाभ होत असतो, उदा. पूर्वीच्या जन्मी एखादा
माणूससंगीतज्ञ असेल, तर
या जन्मी संगीत शिकतांना त्याची फार थोड्या वेळातविलक्षण प्रगती होईल. पूर्वीच्या
जन्मात अध्यात्मशास्त्रात पारंगत असल्यासया जन्मात त्याला पहिल्यापासून
अध्यात्मशास्त्राची आवड असेल. आदिशंकराचार्यवयाच्या ८ व्या वर्षी वेद शिकवत असत
आणि त्यांचा अर्थ समजावून सांगत असत. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितले आहे.
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽपि जायते
।
या
जन्मात सिद्धावस्थेस न पोहोचलेलायोगी किंवा साधक मृत्यूनंतर सात्त्विक किंवा
ऐश्वर्यवान माणसांच्या घरीजन्म घेतो. सर्वसाधारणपणे बर्याचसंतांचेजन्म आध्यात्मिक वातावरण असलेल्या
घराण्यात झालेले आहेत.
घरात
दारू किंवा सिगारेटचेव्यसनअसलेली माणसे असतील, तर पूर्वी दारू किंवा सिगारेटचे
व्यसन असलेला जीवत्या घरात जन्म घेईल. याउलट घरात सात्त्विक वातावरण असेल, तर एखादापुण्यात्मा अशा घरी जन्म
घेईल; म्हणून आपली
मुले चांगली व्हावीत, असे
वाटतअसेल, तर आपण
सात्त्विक आहार-विहार, आचार
आणि विचार करण्यास शिकले पाहिजेअन् आपण स्वतः सात्त्विक प्रवृत्तीचे व्हावयास हवे.
संस्कार म्हणजे काय ?
१.
संस्काराची व्याख्या
संस्कार
म्हणजे गुणांचा गुणाकार आणिदोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील
गुण वाढवायचे आणिदोषांचा भागाकार याचा अर्थ स्वतःमधील दोष अल्प (कमी) करायचे.
मनन
करून, सर्वांगीण विचार करून कृती करतोतो मानव. विचार व कृती चांगल्या
होण्यासाठी संस्कारांची गरज असते. भारतीयशास्त्राप्रमाणे प्रत्येक कृतीच
संस्कारयुक्त असली पाहिजे. प्रत्येक कार्यचचांगले संस्कारयुक्त असावयास पाहिजे, उदा. केळी खाऊन आपण
साले टाकतो हीकृती आहे. केळे खाऊन साल कचऱ्याच्या टोपलीत टाकणे ही प्रकृती. केळे
खाऊनसाल रस्त्यावर टाकणे ही विकृती. दुसऱ्याने रस्त्यावर टाकलेली सालकचऱ्याच्या
डब्यात टाकणे ही संस्कृती.
२.
संस्काराचे प्रकार
मुलांनो, तुम्हाला चांगली
व्यक्ती बनायचे असल्याने स्वतःवरचांगले संस्कारकरून घेण्याचा प्रयत्न करा. चांगले संस्कार आणि वाईट संस्कार
यांची काही उदाहरणे पुढे देत आहोत.
२ अ. चांगले संस्कार :सकाळी
लवकर उठणे, आई-वडील अन् मोठी माणसे यांना नमस्कार करणे, सर्वांशीनम्रतेने अन्
प्रेमाने वागणे, स्वच्छता राखणे,
नीटनेटके रहाणे, प्रतिदिनशाळेत जाणे, गृहपाठ वेळच्या वेळी
करणे, आईला घरकामात साहाय्य करणे इत्यादी.
२ आ. वाईट संस्कार :सकाळी
उशिरा उठणे, सतत दूरचित्रवाणी (टी.व्ही.) पहात बसणे, अभ्यासन करणे, उलट बोलणे, अस्वच्छ रहाणे,
पुस्तकांचा खण व्यवस्थित न ठेवणे, खोटे बोलणे इत्यादी.
संस्कार
करणे म्हणजे चांगल्या सवयीलावणे व वाईट सवयी काढून टाकणे. मुलांवर चांगले संस्कार
करावयाचे म्हणजेत्याला 'आई-वडिलांना रोज नमस्कार कर',
'दुसऱ्याची निंदा करू नको' इत्यादीशिकवावयाचे; पण ते कसे शिकवावयाचे
– तर तत्त्वज्ञान सांगून नाही,
गोष्टीसांगून नाही, चॉकलेट, आईस्क्रिमची लाच देऊन
नाही, तर आपल्या कृतीने. आठवर्षांच्या मुलांना रोज मोठ्या मंडळींना
नमस्कार करावयाची आज्ञा दिलीत, तर ४दिवस करील. पाचव्या दिवशी सांगेल ''मी नाही करणार.'' त्याला
नमस्कारकरण्याच्या फायद्यांबद्दल तत्त्वज्ञान सांगितले, तरी उपयोग होणार
नाही.तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या मुलाने मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, तर एकच उपाय आहे.
आजपासून तुम्ही घरातील सर्व वडील मंडळींना रोज फक्त एकदाचनमस्कार करा. मुलाला
एकदापण नमस्कार करावयास सांगू नका. चार दिवसांच्या आतमुलगा तुमच्या पाठीमागे येऊन
घरातील मोठ्या माणसांना नमस्कार करू लागेल.त्याला लाज वाटेल, की माझे आई-बाबा रोज
आजी-आजोबांना नमस्कार करतात. मीमात्र बेशरमासारखा उभा आहे. संस्कार करणे म्हणजे
तोंड बंद कृती चालू !
३.
लहान वयातच चांगले संस्कार करण्याची आवश्यकता
३ अ. चांगले संस्कार झाल्याने जीवन आदर्श बनते :पूर्वीच्या काळी सर्वच मुले मोठ्यांचा आदर राखत, त्यांना प्रतिदिन
(दररोज)वंदन करत. जेवण्यापूर्वी श्लोक म्हणत. सायंकाळ होताच हात-पाय धुऊनदेवासमोर
दिवा लागल्यावरस्तोत्रेम्हणत. रात्री लवकर झोपत आणि सकाळी लवकर उठत. अशा वागण्यामुळे
त्यांच्यातचांगले गुण निर्माण होत असत. मुलांनो,
तुम्हाला आदर्श विद्यार्थी
म्हणूनसर्वांनी ओळखावे, असे वाटत नाही का ?
आदर्श विद्यार्थी बनण्यासाठी तुम्हीगुणी
व्हायला हवे. चांगले संस्कार झाल्यावर तुम्ही गुणी आणि म्हणून आदर्शव्हाल.
३ आ. चांगले संस्कार झाल्याने जीवन आनंदी बनते :आई-वडिलांचे ऐकणे,
मोठ्यांचा आदर करणे, देवाची भक्ती करणे
इत्यादीसंस्कारांमुळे देवाचा आशीर्वाद मिळून जीवन आनंदी बनते. याउलट दुसर्यांचीटिंगलटवाळी
करणे, मोठ्यांशी उद्धटपणे बोलणे,
खोटे बोलणे इत्यादीकुसंस्कारांमुळे पाप
लागत असल्याने जीवन दुःखी बनते.
३ इ. आदर्श पिढीमुळे राष्ट्राचा उद्धार होतो :छत्रपती शिवाजी महाराजआदर्श असे हिंदवी स्वराज्य स्थापू शकले; कारण ते स्वतः आदर्श
होते. आपणही आदर्श बनलो, तर राष्ट्राचाही उत्कर्ष होईल.
No comments:
Post a Comment